Saturday, May 24, 2014

ध्येय

●● ध्येयपुर्तीसाठी आवश्यक बाबी ●●
( व्यक्तिनुरुप या बाबी वेगळ्या असु शकतात )

* ध्येयाची गरज
* ध्येयाची निश्चिती
* नियोजन
* अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न
* अडथळ्यांवर मात
* आत्मविश्वास

●● ध्येयाची गरज का आहे ? ●●

मित्रांनो,खरंतर माणसाला त्याच्या आयुष्यात कोणतं ना कोणतं तरी ध्येय हे असावंच लागतं.ज्या माणसाकडे कोणतेच ध्येय नाही त्याचे जीवन अर्थहीन म्हणावे लागेल.
कारण ध्येयहीन जीवन म्हणजे दिशाहीन प्रवासच...! ज्याचा शेवट कधी,कुठे अन् कसा होईल हे कुणीच सांगु शकत नाही.
दिशाहीन नाव ज्याप्रमाणे समुद्रात भरकटते तशाच पध्दतीने ध्येयहीन माणुस त्याच्या आयुष्यात भरकटुन जातो.
ज्यांच्या आयुष्यात निश्चित असे ध्येय असते त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

त्यासाठी आपल्याला जीवनात काय करायचंय ते निश्चित करा,ध्येय ठरवा आणि प्रथम प्राधान्य आपल्या करीयरला द्या.

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी आपले स्वराज्य स्थापनेचे ध्येय ठरवले आणि प्रयत्न करुन ते मिळवले.म्हणुनच शिवरायांची किर्ती आज जगभर गायली जाते.

जे ध्येय मिळवल्याने तुमच्या पुढील आयुष्यात फायदा होणार असेल आणि यात कोणतेही दुमत नसेल तर असे ध्येय मिळवण्यासाठी दृढ निश्चयाने प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
नाहीतर आज तुम्ही जे करत आहात तेच भविष्यात करत राहीलात तर भविष्यातही तुम्हाला तेच मिळत राहील जे आज तुम्हाला मिळत आहे.
तुम्हाला वेगळे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला वेगळे काहीतरी करावे लागेल.
त्यासाठी आपले ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयाच्या पुर्तीसाठी आवश्यक प्रयत्न करणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे.

●● ध्येयाची निश्चिती ●●

केवळ एक धाडसी निर्णयच तुमचे सगळे आयुष्यच बदलुन टाकु शकतो.त्यासाठी निर्णय घ्या.ध्येय ठरवा.
ध्येय ठरवणे हेच अर्धे ध्येय मिळवण्यासारखे आहे.स्वतःची क्षमता ओळखुन आणि पाठीमागच्या अनुभवांवरुन आपले ध्येय ठरवता येईल.
ध्येय ठरवत असताना ते ध्येय SMART असावे.
S - Specific -आपले ध्येय निश्चि व ठराविक असावे.
M - Measurable -आपले ध्येय आवाक्यातले परंतु आव्हानात्मक असावे.
A - Achievable -आपले ध्येय साध्य होण्याजोगे वास्तव व योग्य असावे.
R - Reviewable -आपल्या ध्येयाचे प्रत्येक टप्प्यावर अवलोकन करता आले पाहिजे.
T - Time Bounded -आपल्या ध्येयाला वेळेचे निश्चित बंधन असावे.

वेळ-काळानुसार आपल्या ध्येयात आपल्याला थोडेफार बदल करताही आले पाहीजेत,याप्रमाणात ते लवचिकही असावे.

●● नियोजन ●●

एकदा का निश्चित ध्येय ठरवले की मग ते ध्येय पुर्ण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींची तयारी करता येईल.नियोजन हा ध्येयपुर्तीसाठीचा खुप महत्वाचा भाग आहे.ध्येयाचे वेळेशी सुसंगत नियोजन असेल तर निम्मे काम सोपे होते.ध्येयपुर्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन त्यानुसार वाटचाल केली तर सुरळीतपणे ध्येयापर्यंत पोचण्यात काहीच अडचण येत नाही.

●● अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न ●●

असाध्य ते साध्य | करिता सायास |
कारण अभ्यास | तुका म्हणे ||

कोणतीही गोष्ट केवळ अभ्यासानेच शक्य होते.
ज्याप्रमाणे शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते,त्याप्रमाणेच आधीच कष्ट घेतले असता परत जास्त धावाधाव करावी लागणार नाही.
आपले ध्येय मिळवायचे असतील तर अभ्यासाशिवाय शक्य नाही.ध्येयाची तीव्र गरज ही अभ्यासाची पहीली पायरी आहे. ध्येय उराशी बाळगुन ध्येयाने झपाटुन काम केले तर ध्येय प्राप्त होते,कारण संधी ही खेचुनच आणावी लागते.आपल्याला ध्येयावर इतर इतके लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे की किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करता येईल.
यशावर नजर ठेवण्यापेक्षा आपल्या प्रयत्नांवर नजर ठेवा,कारण प्रयत्नाने सर्व गोष्टी मिळवता येतात.ध्येयाचा पाठपुरावा केला तरच ध्येय मिळेल.
ध्येयाची चाहुल लागल्यावर संघर्ष चालु होतो आणि ध्येयाच्या ध्यासाने श्रमाचा त्रास कमी होतो.म्हणुन एकाग्र मनाने ध्येयाकडे वाटचाल केल्यास ध्येय लवकर गाठता येते.
पायाने चालणारे फक्त अंतर कापतात पण डोक्याने चालणारे ध्येयापर्यंत पोचतात.

●● अडथळ्यांवर मात ●●

ही खुप महत्वाची बाब आहे.आपल्या ध्येयामधे अनेक अडथळे येतात.काही आपण निर्माण करतो तर काही ध्येयाशी निगडित असतात.
ध्येयपुर्तीमधे खुप नुकसान होत असेल तर घेतलेला निर्णय बदलण्याचा तुम्हाला निश्चितच अधिकार आहे.
त्यासाठी एक काम करा.
आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवा.हे ध्येय मिळवताना कोणत्या अडचणी आपण स्वतःहुन निर्माण केल्या आहेत आणि कोणत्या ध्येयाशी निगडीत आहेत याची यादी करा.आपण स्वतःहुन निर्माण केलेल्या अडचणी अगदी कठोर मनाने दुर करा.ध्येयापासुन विचलित करणाऱ्या गोष्टींपासुन अंग काढुन घ्या.सद्य परीस्थिती मान्य करुन त्यात काय सुधारणा करु शकतो हा विचार करुन कामाला लागा.
राहीला प्रश्न इतर अडचणींचा तर प्रयत्नाने प्रत्येक गोष्टीवर मात करता येते हेच लक्षात ठेवा.चिकाटी सोडु नका.

●● आत्मविश्वास ●●

आत्मविश्वास हा आपल्या प्रत्येकाजवळ असतो.तो जागृत होण्यासाठी त्याला चुचकारावं लागतं.तो निर्माण होण्यासाठी कुणीतरी प्रोत्साहन द्यावे लागतं आणि एकदा जर हा निर्माण झाला तर प्रचंड अशी कार्य घडवुन आणतो.
मनाचे खच्चीकरण करणाऱ्या, न्युनगंड वाढवणाऱ्या विचारांना दुर सारुन आपण जेव्हा जीवनातली सकारात्मक,प्रकाशमान बाजु पहायला शिकतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो.यासाठी शारीरिक व्यायाम,योगा सारखे उपक्रम अमलात आणा.
जगात काहीच अशक्य नाही,फक्त आपण ते मनावर घेत नाही इतकेच.
शेवटी आत्मविश्वासानेच ध्येयाला गवसणी घालता येईल.त्यासाठी स्वतःवर पुर्ण विश्वास ठेऊन ध्येयाकडे वाटचाल करा.यश तुमचेच आहे.

●● काही Motivational वाक्य ●●

* तुम्ही ध्येयाकडे चालत गेला तर ध्येय तुमच्याकडे धावत येते.
-स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर छत्रपती शंभुराजे

* आपण काय करणार आहोत ते एकदा निश्चित करा.ती गोष्ट आपण करणारच हे निश्चित करुन टाका.ती गोष्ट करण्यासाठीचे मार्ग शोधण्याच्या मागे लागा.
-अब्राहम लिंकन

* तुम्ही जे स्वप्न पाहीलंय,जी गोष्ट तुम्ही करु शकता त्याची सुरुवात लगेच करा.धाडसामधे जादु आहे, ताकत आहे आणि सर्जनशिलतादेखील आहे. सुरुवात करा.
-गोशे.

* आकाश त्यांच्यासाठीच छोटं आहे
जे त्याहूनही ऊंचीची स्वप्ने बघतात..
हे जग त्यांच्यासाठीच खोटं आहे
जे एखाद्या ध्येयाशिवाय जीवन जगतात..

|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ||

-अनिल माने

Friday, May 25, 2012

कसा होता संभाजी ?

कसा होता संभाजी ?
कसा होता संभाजी ? विचारताच प्रश्न,
येते उत्तर- होता ‘रगेल आणि रंगेल’,
कर्तुत्ववान शिवपुत्राचा इतिहास बाटवला गेला,
आणि आम्ही षंढासारखे पाहत राहिलो,
माफ करा शंभूराजे आम्हाला,
...आम्ही नालायक ठरलो,
साडे तीनशे वर्षे मनुवादी भूतांची गुलामगिरी,
सहन करत राहिलो,
नाही आवाज उठला आमचा,
नाही लिहिला सत्य इतिहास तुमचा,
पराक्रमी शिवपुत्र आपण,
चालली तलवार आणि लेखणीही,
भडकली माथी संस्कृतीच्या धर्माच्या ठेकेदारांची,
मक्तेदारी माडीत काढल्याचा राग,
एकजात सगळे पेटून उठले,
ज्या घरचे खाल्ले, त्या घरचेच वासे मोजले,
तीनदा विषप्रयोग आणि एकदा कैदेचे आडाखे,
महाराज, आपले नशीब बलवत्तर,
म्हणून अपयशी ठरले स्वराज्याचे खरे शत्रू,
शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे तेच,
आपल्या कैदेची स्वप्ने पाहणारेही तेच,
आपल्यावर विषप्रयोग करणारेही तेच,
आणि स्वराज्याच्या राख-रांगोळीसाठी प्रयत्न करणारेही तेच,
‘तेच’—कोण होते ते ?
नव्हते कोणी मुस्लीम, मराठे, बहुजन,
सारेच कसे काय ब्राम्हण ?
महाराज,
आज आमच्यावर आरोप केला जातो
ब्राम्हणांची निन्दानालस्ती केल्याचा,
आम्ही फक्त इतिहास सांगितला तरी निंदा नालस्ती,
आणि त्यांनी सर्व इतिहास बाटवला त्याचे काय ?
परंतु महाराज,
पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रश्न विचारायचे नसतात,
नाही आम्हालाच अक्कल कारण,
आम्ही आपणाला निष्कलंक ठरवू पाहत होतो,
पण कसे बघवेल या धर्ममार्तंडाना,
विकाऊ जेम्स लेन द्वारे घेतला संशय जिजाऊंच्या चारित्र्यावर,
महाराज, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याला स्वताच्या आईची विटंबना झाल्याचे दुःख झाले,
वेडात दौडले वीर मराठे बहात्तर,
आणि एकाच कल्लोळ उठला,
अतिरेकी, दहशतवादी आणि शेलक्या शिव्या,
पुरोगामी-प्रतिगामी-समाजवाद
ी-गांधीवादी-कम्युनिस्ट सारे एक झाले,
जातीवर शेकले तर कशी तारांबळ उडते ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिले
पण महाराज, आता काळजी नको,
आता घराघरात एकतरी विद्रोही ‘मराठा’ जन्मतोय,
करतोय चिकित्सा आणि स्वीकारतोय सत्य,
जेव्हा सनातनी विचारसरणी पुसून टाकण्यात होवू यशस्वी,
तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने होईल धन्य.

Thursday, May 24, 2012

मावळ्यांची विटंबना अवमान थांबवा ...

मावळ्यांची विटंबना अवमान थांबवा ...
पुणे मुंबई सातारा कोल्हापूर
इत्यादी ठिकाणी सध्या एक मोठी लाट
आली आहे..
ती म्हणजे शिवकालीन वेशभूषेतील
मावळ्यांना लग्नात वेटर चे काम करवण्याची ......
सध्या काही लग्न शिवकालीन वातावरणात
लागत आहेत.
पण मंडपात मात्र लग्नातील वेटर हे
मावळ्याचा पोशाख घालून
... पाहुणेमंडळी यांना चहा पाणी कोल्ड्रिंक्स
इत्यादी वेटर सारखे काम करत असतात......
मावळ्यांना वेटर बनवणारे लोक
माझ्या दृष्टीने नालायक आणि हरामखोर
आहेत........
अरे
शिवरायांनी आपल्या मावळ्यांना तळहाताच्या फोडा प्रमाणे
जपले आणि आज शिवरायांचे नाव घेणारे लोक
मावळ्यांना वेटर बनवून
आपल्या श्रीमंती चा माज दाखवत आहेत....
वेटरला मावळ्याची वेशभूषा नसावी.....
याने शिवरायांचा आणि तमाम मावळ्यांचा अवमान
होतो....
असा अवमान या पुढे कोणाकडूनहि घडू
नये..
जय जिजाऊ
जय शिवराय

Sunday, February 19, 2012

शिवाजी महाराजांची तलवार



शिवाजी महाराजांची तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८ प्रमुख तलवारी होत्या,त्यातील सर्वात महत्वाची तलवार फिरंगी किवा भवानी तलवार जी सध्या रोयाल ब्रिटीश संघ्रलाय इंग्लंड मध्ये आहे.
शिवाजी महाराजांनी फिरंगी तलवार उर्फ भवानी तलवार portuguese ...व्यापार्यांकडून विकत घेतली होती.असा म्हंटल्या जाते नंतर शिवरायांनी भवानी मातेसमोर त्या तलवारीची प्रतीस्तापणा केली आणि त्या ताल्वारीमध्ये तोडासा बदल करून तिचे नाव भवानी तलवार ठेवले.
फिरंगी तलवार उर्फ भवानी तलवार ३५ ते ३८ इंची लामब असते ,फिरंगी तलवारला single sided किवा double sided धार असते.व तलवारीची मुठ स्टील ची असते.शिवरायांनी फिरंगी तलवार मध्ये काही बद्दल देखील केले,ते म्हणजे तलवारीच्या मुठीमध्ये कापुसाची गाधी भरली जेणेकरून ती सैनिकांना घाम आल्यावर तलवार हातातून निसटणार नाही.
काही दैववाद करणाऱ्या इतिहासकारांनी असे सांगितले आहे कि शिवरायांना भवानी तलवार स्वयं भवानी मातेने प्रगट होऊन दिले आहे.
जर भवानी मातेने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली तर मग त्याच प्रकारची तलवार शाहजहान ह्या मुस्लीम शासकाकडे व बाजीराव पेशव्याकडे कोठून आली,शाहजहान आणि बाजीराव पेशव्याला पण भवानी माता प्रसन्ना झाली होती का?
सध्या फ्रेंच इतिहासकार फ्रान्सीस gouitier ह्या फ्रेंच इतिहासकाराने भवानी माता शिवरायांना तलवार देतांनाचा पुतळा बनवला आहे,अश्या स्वरूपाचे पुतळे उभारून आपण जिजामाता व शिवरायांचे कर्तुत्व नाकारत आहोत का?
ज्या शिवरायांनी मंगठीच्या झोरावर स्वराज्य निर्माण केले त्याला दैव वादाचे रूप देणे योग्य आहे का?शिवरायांना देवी प्रसन्ना झाली म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले असा प्रचार करणे योग्य आहे का?
ज्या प्रकारे राम आणि कृष्ण ह्यांना विष्णूचा अवतार घोषित करून त्यांचा वापर दान आणि दक्षिणा मिळवण्यासाठी भटांनी केला तसाच प्रकारे मराठा साम्राज्याचा बाबतीत भाकड कथा रचणे योग्य का?छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने स्वतः प्रगट होऊन तलवार दिली होती आणि त्याच तलवारीला भवानी तलवार म्हणतात असा अपप्रचार देशभरात करण्यात आलेला आहे.काही इतिहास्कारांनीच असा अपप्रचार केलेला आहे.छ.शिवाजी महाराजांचे कर्तुत्व लोकांपर्यंत पोहोचूनही अशा या अपप्रचाराने कर्तुत्वप्रधान महाराष्ट्रिय समाज दैववादी बनून बसला आणि महाराजांना भवानी मातेचा आशीर्वाद होता म्हणूनच ते इतके पराक्रम करू शकले आणि संकटातून नेहमी वाचत राहिले असाच विचार समाजमनात पेरला गेला.चांगल्या नशिबाशिवाय काहीच करता येत नाही असे लोक समजू लागले.या इतिहासकारांनी असा प्रचार का केला हे त्यांनाच माहित असेल.त्यांनी असे चुकून केले असे समजायला आपण काही मूर्ख नाही कारण सावंतवाडी जवळील कुडाळ नावाच्या गावातून एका पोर्तुगीज व्यापाऱ्याकडून ३०० होण (१०५० रुपये) रोख देऊन ही तलवार विकत घेतल्याची नोंद महाराजांनी त्यांच्या दफ्तरात(accounts मध्ये) करून ठेवलेली आहे.महाराज केलेला प्रत्येक खर्च दफ्तरात लिहित असत कारण हिशोबात पक्के असण्याचा महाराजांचा कटाक्ष होता.५ मार्च १६५९ ला ही तलवार विकत घेतल्याचे येथे नमूद केले आहे.असे असूनही या इतिहासकारांनी असल्या प्रकारचा अपप्रचार का केला असावा हे समजण्याइतके आपण सर्व सुध्न्य आहात.पुन्हा जर कुणी छ.शिवरायांच्या तलवारीच्या बाबतीत असा अपप्रचार केला तर आपण कुणीही या भूलथापांना बळी पडू नये.आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेऊन पुढील जीवन जगण्याचा मनोनिग्रह करूया.
..................छ.शिवाजी महाराज की जय.............

कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज